आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Monday 12 December 2011

१४.कर्नल यादवांच्या घरी घडलेला किस्सा

आसामात ओळख झालेल्या कर्नल यादवांच्या घरी घडलेला किस्सा

संकलन - दि २७ ऑक्टोबर २०११.
असा अपमान कधी झालेला नव्हता !
आम्ही सहज गप्पा मारत असतान एक फोन आला. तो बाबांनी घेतला. तो खाली ठेऊन मग बाबा म्हणाले, आलेला फोन कर्नल यादवांचा होता थांबा तुम्हाला त्यांचा तो किस्सा सांगतो.. आम्हादोघांचा पुर्व परिचय हवाईदलातून झाला असल्याने बाबांना माझ्याशी बोलताना सहजच आर्मी व हवाईदलातील काहींच्या कथा सुनवायला हुरूप येतो. मी सरसावलो. मोबाईलवरील रेकॉडींगची तयारी करून तो बाबांच्या हाती देत त्यांना म्हटले, आता सांगा. हे रेकॉर्डींग नंतर मी मोबाईलवरून कॉम्पवर काढून ते एकांना ईमेल करून त्यांना टायपिंगकरायला पाठवले गेले. ते आपल्याला बाबांच्या आत्मकथनातून सादर होत आहे. 
 आसाम में बाबा के साथ.. कुर्सीपर कर्नल तिहोतिया,पीछे खडे... कर्नल दीप, कर्नल यादव तथा श्री. पवन अग्रवाल...बैठे सुभेदार, JWO दीक्षित, ब्रिगेडियर तोमर             
बाबा सांगतात,1996 मध्ये मी रिटायर्ड झालो. रिटायर्ड होण्यापूर्वी एक वर्ष आधी मी आसामला होतो. तिथं कर्नल यादवांची भेट झाली. पुष्कळ सामान्य शिपायापासून ते कर्नल ब्रिगेडियर वगैरे पर्यंत अनेक तेथे माझे शिष्य झाले. त्यातच कर्नल यादव होते. तिथे खूप चांगले वास्तव्य झाल्यानंतर मी इथे पुण्याला बदलून आलो. एकदा यादवांनी फार आग्रह केला म्हणून 1997 साली त्यांच्याकडे गेलो. तिथे त्यांनी माझं आदरातिथ्य इतकं केलं की ते शब्दाने वर्णन करता येत नाही. सगळं साजुक तुपामध्ये जेवण! हे! ते! हात पाय दाबून सेवा काय करणे, फळे खाऊ घालणे, वगैरे-वगैरे. असं होत असताना आता मी दुसऱ्या दिवशी निघणार, त्या रात्रीची गोष्ट. एका-एकी त्यांची मुलगी फार जोरात ओरडली. त्यावेळी त्या मुलीच वय असेल सतरा-अठरा. ती बारावी झाली होती किंवा होणार होती. आम्ही सगळे घरामध्ये धावलो. पाहिलं तर ती डोळे वाकडे तिकडे करून वेड्यासारखी काहीतरी पाहत होती, ओरडत होती.
मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी मी परत दिल्ली आलो आणि परत दिल्लीवरून पुण्याला परतलो. हे घडलं राजस्थान-हरयाणाच्या बॉर्डरवरच्या अलवरच्य़ा जवळच्या गावामध्ये. नंतर झाली गेली गोष्ट मी विसरून गेलो.
नंतर काही दिवसांनी त्या मुलीची पुन्हा तब्येत फार बिघडली. ती दिवसा-रात्री एकाएकी ओरडायला लागली. म्हणून तिनं बाहेरसुध्दा जाणं सोडून दिलं. मला यादवांचा फोन आला की, बाबा तुम्ही एकदा मुलीला येऊन पहा तिला काय झालंय ते कळत नाही. सगळे डॉक्टर-वैद्य झाले, देव झाले, तंत्र-मंत्र झाले, काळे कमळीवाले बाबा झाले. सगळ्यांचे सगळे उपाय झाले. कुठे काही गुणच पडत नाही.
नेमक्या त्याच वेळेस दुर्देवाने आमच्या बायकोला ब्रेन हॅमरेज सारखा प्रकार झाला आणि मला कुठेच जाता आलं नाही. मला तिच्याकडे खुप लक्ष द्यावं लागलं. पत्नीली काही ऐकु येत नव्हतं, दिसतं नव्हतं, एक सारखी खाली पडत होती आणि मुलं फार लहान होती. ती शाळेत शिकत होती. अबु आणि पप्पु. मोठी मुलगी- संजूचं नुकतच लग्न ठरत होतं. कॉलेज झालं होतं ती नोकरी करत होती. अशा परिस्थितीत मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. पुढे दुर्देवाने त्यांचे मला धमकीचे फोन येऊ लागले की, हे तुम्हीच केलेलं आहे. तुमच्यामुळेच हे झालेलं आहे. जर तुम्ही माझ्या मुलीला नीट नाही केलं तर आम्ही जाट आहोत. आम्ही असं करू आम्ही तसं करू वगैरे वगैरे... त्यांच्या बायकोने सुद्धा मला फोनवरून शिव्या दिल्या. यादव साहेबांनीसुद्धा मला खूप डाटलं. त्यांनी मला असा टॉर्चर करायला सुरूवात केली. पण काही करू शकलो नाही. मी जाऊ शकत नव्हतो कारण बायको खूप सिरीयस होती.
तो काळ निघुन गेला. पत्नी ठीक झाली आणि पुढे पाच-सहा महिन्यांनी मला वेळ मिळाल्यानंतर मी दिल्लीला गेलो. तेथून पुढे मी यादवांच्या घरी पोहोचलो. त्यांनी माझं पुन्हा आदरातिथ्य केलं आणि म्हटलं, आपने बहुत बुरा किया। हमने ऐसा सोचा, वैसा सोचा असं खूप बोलले. असं एकएक दटावणीखोर बोल त्यांनी लावले. मला वाईट वाटलं. मी म्हणालो, माझ्या मनात आपल्याबद्दल पाप नाहीये. तुमचं सगळ्याचं मी कल्याण केलयं, तर माझ्या मनात तुमच्या मुलीबद्दल काही शंका नाही. मी तसा मनुष्य नाहीये. तुमची काहीतरी चुक होतेयं. मी प्रेमाखातर तुमच्या घरी आलो. तुम्ही माझा जो आदरसत्कार केलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जिथं मनुष्य जेवतो, त्या थाळीला ब्राम्हण मनुष्य तरी भोक पाडत नाही.
तरी पण तुम्हाला हे मी केलय असं वाटतय तर ते माझं दुर्देव आहे मी त्याला काही करू शकत नाही. तुमाला काय करायचं ते करा. मी इथे आलेलो आहे. माझे तुकडे करायचे असतील तर करा.
त्यांचा रागरंग वाईटच दिसला. ते उर्मट भाषेमध्ये काही बाही बोलले. तरीही मी प्रयत्न करतो म्हणालो. मी यज्ञकुंड तयार केलं.
बाबांना थांबवून मी विचारले, ते बरे तयार झाले? बाबा म्हणाले, होना, त्यांना मुलगा बरी करून पाहिजे होती म्हणून त्यांनी तयारी केली.
त्याच्यासमोर मुलीला बसवलं. मी आवाहन करून प्रयत्न केला. रात्री नऊ वाजता आम्ही बसलो. दहा, अकरा, साडे अकरा काही उपयोग झाला नाही. ती माझ्याकडे पाहून हेटाळणीच्या सुरामध्ये हा-हा-हा हसायची. अरे तेरे जैसे बहुत देखे असं म्हणायची. परत हसायची. त्या हसण्यामध्ये एक कटुता दिसायची. आधीच मी गर्भगळीत झालेला. परगावी कर्नलच्या घरच्यांकडून अपमानित केलेला. त्यात जेसीओ म्हणून रिटायर्ड झालेला. आता काय करावं. काय करावं सुचेना. बाबा जालंधरमहाराजांना विनंती केली, कुलस्वामिनीला, महाबजरंगबलीला विनंती केली पण काय म्हणता कोणाकडूनही उत्तर येतच नाही अशी परिस्थिती झाली. हतबल झालो आणि ...
अचानक मला महाराजांनी चित्र दाखवलं. बाबांनी हातांनी हवेत गोलगोल करत म्हटले, गोल-गोल... मला आठवतं पिक्चर पाहत असताना कधीतरी असं गोलगोल काहीतरी दाखवायचॆ आणि आधी घडलेली घटना असं दाखवायचे. आणि माझ्या मनात आयडीया आली की हे पूण्यजन्मकर्माचं कारण तर नसेल. पिक्चरमध्ये दाखवायचे तसा तोपर्यंत याचा अनुभव कधीच आला नव्हता. हा पहिल्यांदा अनुभव आला. बॅकमध्ये काही घटना घडली असेल म्हणून म्हटलं हिला बॅक जन्मामध्ये घेऊन जावं. म्हणून हळुहळू स्वतः तिच्या बॅकमध्ये एंट्री केली आणि तिलाही खेचली त्या चक्रव्ह्यूहामध्ये. पन्नास, साठ, सत्तर, एंशी, दोनशे, अडीचशे, तीनशे, साडेतिनशे, चारशे, पाचशे, साडे पाचशे, सहाशे, साडेसहाशे, सातशे, आठशे, नऊशे, दहाशे, अकराशे, बाराशे वर्षे पुढे सरकत होती. ... गरगर...गरगर. एक एक जन्म...खटखट... तिच्याबरोबर मी आहेच... आणि एका जन्मात आल्यावर ती जोरात घोगऱ्या आवाजात ओरडली... व्हॉव व्हॉव करत... तिला मुळ रुपात मी पाहिलं. म्हटलं कोण आहेस ते सांग. ती हरामखोर, राक्षसीण होती. हा...हा... करून अंगावर आली. तिला म्हटलं आपल्यामध्ये इतकं अंतर आहे की तु माझं काहीच करू शकत नाही. हे अंतर तुझ्या बापालाही तोडता येणार नाही. पण मी मात्र प्रत्यक्ष तुझ्या या जन्मापर्यंत आलेलो आहे. मी तुला तोडू शकेन. हळूहळू तिने रागाचे रुप सोडून तरूण स्त्रीचं रूप धारण केलं. इतकी सुंदर नव्हती पण तरूण तरी नक्कीच होती आणि नमस्कार केला. म्हणाली महाराज, ही देवाची लीला आहे. तुम्हाला जर मला शिक्षा करायची असेल तर नक्कीच करू शकता. पण माझा याच्यात काहीसुध्दा अपराध नाही. मी राक्षसीण होते, कबुल आहे माझ्या हातून चुका झाल्या असतील देवाने त्यासाठी मला शिक्षाही दिल्या. काय द्यायच्या त्या. मी आता त्या योनीमध्येसुध्दा नाही. त्या योनीतून मी खूप दूर निघून गेलेली आहे. तुम्ही बोलावलं म्हणून यावं लागलं.
पण तु आहेस कोण?’ मी विचारले .. तुमच्या समोर बसलेली ती मीच आहे.’
पण ती घाबरते कशाला?... ओरडते कशाला?
काळाचा पडदा सरकला महाराजा आणि तिला आपलं पुर्वजन्मातलं स्वरूप दिसलं आणि ती ते भयानक रूद्र, भयंकर रूप पाहून ती घाबरली आणि त्यामुळेच एवढं घडलेलं आहे बाकी काही घडलेलं नाही.
मी काय करू म्हणजे ही मुलगी बरी होईल?’
काही नाही तुम्ही हा काळाचा पडदा बंद करा आणि हा परत उघडणार नाही याची काळजी घ्या. एवढं जर तुम्ही करू शकाल तर हिला त्रास होणार नाही. मी तुम्हाला वचन देऊन सांगेन. बाकी तुम्हाला मला जाळायचं असेल, मला काही शिक्षा करायची असेल ती तुम्ही करू शकता. तुम्ही तितके शक्तीमान आहेत. पण यात माझी काहीसुध्दा चूक नाही.
झालं...यज्ञ कुंड शांत झाले. तो आवेश मुलीचा ओसरला. मी तिला जागे करून म्हणालो, बोलं आता काय बोलायच तुला?
बाबाजी. ती मुलगी खाली वाकून नमस्कारकरून आता बोलायला लागली, क्या बताऊं? मुझे कुठ याद नहीं। अब सब अपनासा लगता है। त्याच्याआधी नुसती हसत होती.....
आणि असा तो बिकट प्रसंग बाबांच्या गोल गोल इशाऱ्यामुळे उलथवून लावला गेला. त्यानंतर पुढे तिचं लग्न झालं. तिला एक मुलगा- मुलगी आहे. आता नवरा लेफ्टनंट कर्नल आहे. पण नंतर हा तिला कधीच त्रास झाला नाही.
ही अशी आयुष्यात घडलेली अपमानकारक अपशब्द ऐकून घ्यायची एकमेव घटना की ज्यात मला काहीच कळत नव्हतं. किती तास बसलो. काय करायचं काय. कारण ते पिशाश्च नाहीच आहे. काही कारणामुळे तो काळाचा पडदा सरकला आणि ते तिचेच पुर्वरूद्र रूप बघुन ती घाबरली.
पुढे याच कर्नल य़ादवांनी व घरच्यांनी त्यांच्या घरातून निघताना व नंतर पुण्यात घरी येऊन पुन्हा पुन्हा अजीजीपुर्वक माफी मागितली. त्यानंतर आणखी एका प्रसंगातून कर्नल यादवांनी वेळेवर एकांना केलेली मदत फारच मोलाची होती. त्याचा किस्सा सांगेन नंतर कधीतरी...
-------- पुढे चालू....

No comments:

Post a Comment