आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Monday 12 December 2011

८. रेल्वेलाईनच्या खाली रामाचं देऊळ!


८. रेल्वेलाईनच्या खाली रामाचं देऊळ!

रेल्वे लाईनमधून चालत घेऊन गेले. नाशिक रोडकडे. आणि त्यानंतर जवळजवळ एक दीड किलोमीटरवर रेल्वेलाईनच्या पुलाखाली घेऊन गेले. तिथे एक रामाचं देऊळ होतं. त्याच्यामध्ये तीनचार मूर्त्या होत्या. तिथे मला बसवलं आणि म्हणाले गुरूच ध्यान कर. मला कुठे ध्यान करता येत होतं. पण मी आपलं ध्यान करत बसलो. ते थोड्यावेळानं परत आले. नंतर आम्ही परतलो. त्यानंतर मी कित्येकदा त्या ठिकाणी ते मंदिर पहायला पुलाखाली गेलो तर तिथे काहीच नाही ! त्यादिवशी खात्रीने मी काशी विश्वेश्वर महाराजांबरोबर रेल्वेपुलाखालील राम मंदिरात गेलो होतो हे नक्की पण मग नंतर ते कुठे गायब झाले मला सांगता येत नाही.

चल परत. परत आलो. तिथे स्टेशनमास्तरनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. तिथे जेवण घेतलं आणि ते म्हणाले, ‘तु आता माझ्या मठावर ये.’ त्यावेळी त्यांचा जांभळ्याला मठ होता. म्हणजे औरंगाबाद नाशिकच्या मध्ये चौदा किंवा अठरा किलोमीटरवरती डाव्या हाताला जांभळ्याला बाबांचा मठ होता. त्या मठामध्ये जावून मी सेवा सुरू केली. तेव्हापासून जवळजवळ पस्तीस वर्षे बाबांची सेवा केली. ९७ साली बाबा गेले. त्यांची सेवा केली. दरवर्षी सुट्टीत दोन महिने त्यांच्याजवळ जायचो. त्यांनी मला पुष्कळ शिकवलं. त्यांनीच मला मार्गावर आणलं. शिव्या दिल्या, मारलंही आहे, कष्टही खूप करून घेतले, पण प्रेमही तेवढच दिलं आहे. जिवंत आहे तोपर्यंत मी त्यांना विसरू शकत नाही. तेंव्हा गुरूचा साक्षात्कार झाला आणि मला पुढे कळलं मला एअरफोर्समध्ये का टाकलं. नाथपंथी एकसारखे फिरतात, एका ठिकाणी राहत नाहीत. ते फिरतच असतात. म्हणून त्यांनी मला त्यांनी हिंदुस्थानभर फिरवलं. तुम्हाला खोटं वाटेलं लोकहो, एअरफोर्समध्ये म्हणा मिलिटरीमध्ये म्हणा पीटी-परेड ही अगदी करायलाच पाहिजे. पण मी कधी पीटीला गेलो नाही, परेडला गेलो नाही. मी कधी अभ्यास केला नाही तरीसुध्दा मी पास झालो. मला कोणी विचारलं सुध्दा नाही की तु पीटीला का येत नाही. परेडला का येत नाही. एका सेक्शनमध्ये हे शक्य आहे. पण मी खूप सेक्शनमध्ये फिरलो. हे कसं घडलं आज जेव्हा विचार करतो तेव्हा कळतं मीच मूर्ख आहे म्हणून मला त्यावेळेस कळलं नाही. अहम झाला, मला कोणी विचारत नाही. प्रत्यक्ष महाराज तिथे माझ्या रूपामध्य ऊभे असतील. म्हणजे मी त्याठिकाणी प्रेझेंटच असेन म्हणून माझ्या अपसेंटीचा प्रश्नच येत नव्हता. ते आज कळतंय. पण आता वेळ निघून गेलेली आहे.

दि . २९ जून २०११.



1 comment: